बुलडाणा : प्रलंबित असलेल्या पीक विम्याच्या प्रश्नासंदर्भात रविकांत तुपकर यांनी आज आक्रमक भूमिका घेतली असून सरकारकडून वारंवार तारीखे वरती तारीखा देण्यात येत असून याच धोरणाचा निषेध तुपकर यांनी केला आहे. १५ सप्टेंबर पर्यंत पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असा शब्द कृषी सचिवांनी या आधी दिला होता, तो शब्द सरकारने पाळला नाही म्हणुन तुपकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
जिल्हा कृषी अधीक्षक मनोज ढगे यांच्या कार्यालयात तुपकर अंथरूण आणि पांघरून सोबत घेऊन गेले. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विम्याचे पैसे पडत नाहीत तोपर्यंत आपण इथेच मुक्काम करणार आहोत असे म्हणत रविकांत तुपकर यांनी ठिय्या मांडला आहे.